Sunday, February 20, 2011

प्राणीमात्र झाले दुखी - समर्थ रामदास

तीनशे वर्ष...... तीनशे वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंध:कारात चाचपडत होता...... वर्षातल्या बाराही अमावस्यांनी जणू गराडा घातला होता....... महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापांखाली वेदनांनी कण्हत होती ....गा-हाण गात होती......


प्राणी मात्र झाले दुःखी, 
पाहता कोणी नाही सुखी
कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी 
माणसा खावया अन्न नाही, 
अंथरुण पांघरुण ते ही नाही 
घर कराया सामुग्री नाही, 
विचार सुचेना काही 
अखंड चिंतेच्या प्रवाही, पडले लोक  

No comments:

Post a Comment