Tuesday, February 22, 2011

सरणार कधी रण प्रभू तरी - कुसुमाग्रज



 चढत्या वाढत्या हिंदवी स्वराज्यावर .. शत्रूही अहि-महीच्या चढत्या बळाने तुटून पडत होते .... रायगडाच्या अभेद्य तटबंदीसारखीच स्वत:च्या देहाची तटबंदी पावनखिंडीत उभी करून झुंजणारे ... हे बाजीप्रभू देशपांडे ..... देवांनाही हेवा वाटावा असा इतिहास इथे घडला ... या पावनखिंडीत .. बाजींच्या देहाची चाळण उडाली होती .. रक्ताचे अर्घ्य ओसंडत होते .. प्रत्येक अर्घ्य विनवीत होता ... " स्वातंत्र्याच्या सूर्या ! .. आता तरी प्रसन्न हो "...


सरणार कधी रण प्रभू तरी
हे कुठवर साहू घाव शिरी

दिसू लागले अभ्र सभोती
विदीर्ण झाली जरी ही छाती
अजून जळते आंतर ज्योती
कसा सावरु देह परी

होय तनूची केवळ चाळण
प्राण उडाया बघती त्यातून
मिटण्या झाले अधीर लोचन
खङग गळाले भूमीवरी

पावन खिंडीत पाऊल रोवून
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का आता घरी

No comments:

Post a Comment